असे दिवे जपले पाहिजेत

प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांच्या जीवित असे रक्षण करण्यास जबाबदार कोण आहे? वारंवार या अशा घटना घडतात. यासंदर्भात कोणताही अधिनियम नाही. या महिला अधिकारी अचानक बळी गेलेल्या नाहीत. त्यामध्ये इतिहास असतो. अत्यंत विघातक अशी ही घटना आहे. एकेक जीव वाचणे हे संपूर्ण जंगल वाचण्यासाठी आवश्यक आहे. त्यात जे दिवे तुफान मध्ये जळतात आणि प्रकाश देतात त्यांना सांभाळण्यासाठी समाजाने ओंजळ केली पाहिजे. सर्वांनी पुढे आले पाहिजे. असे दिवे जपले पाहिजेत. अत्यंत दुर्देवी घटना लोकशाहीला अत्यंत घातक आहे. लोकशाही सुदृढ न झाल्यामुळे आपल्या समाजामध्ये अनेक लोकविघातक गोष्टी घडताना दिसतात. यामध्ये मधून लँड माफिया, खाण माफिया आपले समांतर सरकार चालवत आहे हे दिसत आहे. न जाणू आपण सर्वसामान्य नागरिक गप्प बसल्यामुळे अशी किती समांतर सरकारी सुरू आहेत. केवळ लोकशाहीच्या अज्ञानामुळे हे घडते. मला आठवते शाळेमध्ये नागरिकशास्त्र नावाने घटना आम्हाला 20 मार्कासाठी होती. एकतर ती वेगळ्या नावाने शिकवली गेली. वकिली शिकत असताना नागरिक शास्त्र म्हणजे घटना आहे हे समजले. आणि इतिहासासोबत केवळ 20 मार्कासाठी हा संपूर्ण नागरिकांवर दुर्दैवी अन्याय आहे. 
लोकशाहीचे ज्ञान घ्यावे. जिथून मिळेल तिथून घ्यावे. आणि चांगल्या माणसांनी आता जागे व्हावे. कृपा करून गप्प बसू नये. 
विधीज्ञ रणजितसिंह घाटगे 🦅
9823044282

Comments

Popular posts from this blog

अनुच्छेद 370

गाव नमुने तथा 7/12 पत्रक